LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागेसाठी आज १७ मार्च रोजी हे उमेदवार अर्ज दाखल करणार ; अनेक इच्छुक नाराजांची समजूत कशी काढणार..? सोलापूर जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या अधिक होती

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागेसाठी कोण कोणत्या पक्षाकडून अर्ज भरणार हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे . महायुतीतील भारतीय जनता पार्टी तीन जागा तर शिवसेना एकनाथ शिंदे गट एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा असे निवडणुकीचे धोरण निश्चित झाले असून प्रत्येक पक्षाने आपले विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते आज संध्याकाळपर्यंत निश्चित केलेल्या वेळेपूर्वी अर्ज भरणार हे निश्चित आहे कारण अर्ज भरण्याची १७ मार्च ही शेवटची तारीख आहे २० मार्च रोजी छाननी होणार आहे.
 
अजित पवार गटाकडून संजय खोडके ,   
तर भाजपकडून संजय किणीकर, संदिप जोशी, दादासाहेब केचे, 
शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून रघुनाथ सुर्यवंशी 
या उमेदवारांची जवळपास नावे निश्चित झाली आहेत. आता ऐनवेळी बदल होण्याची शक्यता कमी आहे.
                  महाराष्ट्रा सह विधान परिषदेसाठी शिवसेना-भाजप राष्ट्रवादी या महायुतीकडून अनेकजण इच्छुक होते परंतु सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक इच्छुक संख्या अधिक होती त्यात भाजपकडून माजी विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत ,  
माजी आमदार राम सातपुते यांची नावे समर्थकांकडून आघाडी वर होती तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजन पाटील, उमेश पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना  नेते प्रा. शिवाजी सावंत या सर्वांची  सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार म्हणून नावे चर्चेत होते परंतु महायुतीतील सर्वच पक्षाकडून इतर नावाची अधिकृत घोषणा झालेली असल्याने यांना थांबावं लागणार आहे यांची नाराजी कशाप्रकारे पक्ष घालवणार हा आता औत्सुक्याचाविषय बनणार आहे.

Post a Comment

0 Comments